लखपती दीदी योजना म्हणजे काय?
लखपती दीदी योजना ही केंद्र सरकारच्या “DAY-NRLM” (Deendayal Antyodaya Yojana – National Rural Livelihoods Mission) अंतर्गत राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना उद्योजक बनवणे हा आहे.
योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
- ग्रामीण महिलांना स्वयंपूर्ण बनवणे
- स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास मदत
- वर्षाला किमान ₹1 लाख उत्पन्न मिळवून देणे
कोण लाभ घेऊ शकतो?
पात्रता | तपशील |
वय | 18 ते 50 वर्षे |
लिंग | स्त्री |
क्षेत्र | ग्रामीण भागातील रहिवासी |
सदस्यता | स्वयंसहायता गटातील सदस्य असणे आवश्यक |
कोणते व्यवसाय करता येतील?
- सेंद्रिय शेती
- दुग्धव्यवसाय
- साडी/कपड्यांचे युनिट
- पापड/अगबत्ती बनवणे
- टेलरिंग / सिलाई सेंटर
अर्ज कसा करावा?
- जवळच्या ग्रामपंचायत किंवा महिला व बालविकास कार्यालयात संपर्क करा
- स्वयंसहायता गटात सामील व्हा
- प्रशिक्षण घ्या (सरकारकडून मोफत प्रशिक्षण)
- कर्ज किंवा निधीसाठी अर्ज करा
- ऑफिसिल वेबसाईट साठी इथे क्लिक करा
योजनेचे फायदे:
- महिला सशक्तीकरणाला चालना
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत
- आर्थिक स्थैर्य मिळविण्याची संधी
- मोफत कौशल्य प्रशिक्षण
- बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने कर्ज
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
1. लखपती दीदी योजना 2025 साठी अर्ज कधी करायचा?
उत्तर: ही योजना सुरू आहे, इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
2. या योजनेसाठी प्रशिक्षण कोण देते?
उत्तर: राज्य व जिल्हा स्तरावरील NRLM कडून मोफत प्रशिक्षण दिले जाते.
3. या योजनेत कर्ज किती मिळू शकते?
उत्तर: व्यवसायानुसार ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंतचे कर्ज मिळू शकते.
4. शहरी भागातील महिला अर्ज करू शकतात का?
उत्तर: नाही, ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे.
5. अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
उत्तर: आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, SHG सदस्यत्व प्रमाणपत्र, बँक पासबुक.
📢 निष्कर्ष:
लखपती दीदी योजना ही ग्रामीण महिलांसाठी स्वयंपूर्ण होण्याची एक संधी आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील महिला ग्रामीण भागातून असतील, तर या योजनेचा लाभ नक्की घ्या.