शेतकऱ्यासाठी अपघात विमा |Gopinath Munde Shetkari Apghat Vima

shetkari vima 2024 : केंद्र तसेच राज्य सरकार दरवर्षी गरीब सामन्य नागरिकासाठी नवीन योजना राबण्यासाठी तत्पर असते , आणि त्या योजना नुसत्या कागदपुरत्या नसून त्यांची प्रत्यक्षात अंत्यंत चांगल्या प्रकारे अंबलबजावणी देखील करण्यात येते जेणेकारण अशिक्षित किंवा साक्षर नागरिक त्या shetkari vima 2024 योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे घेतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार मार्फत शेतकरयासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अमलात आणली असून ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि गरजेची योजना आहे. भारतीय कृषी क्षेत्रातील संकटे आणि आव्हानांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही योजना राबवली गेली आहे. शेतकरी आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करतात, आणि त्यात अपघात हे एक महत्त्वाचे कारण आहे. अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने तयार केलेली ही योजना, शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्याच्या उद्देशाने आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश ||

गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी होते, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेक लढा दिला , यामुळेच या योजनेस हे नाव अगदी शोभून दिसते आणि मुख्य उद्देश म्हणजेच कि, शेतकऱ्यांना अपघाताच्या प्रसंगी तातडीने आर्थिक मदत करणे आहे. अपघात झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारा विमा संरक्षण कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करतो . मुख्य हेतू सोबतच आपण या योजनेची पात्रता तपशील ,अर्ज प्रक्रिया , लागणारी कागदपत्रे इत्यादी घटक खालील प्रमाणे पाहणार आहोत .

अधिकृत शासन परिपत्रकातील तपशील थोडक्यात .

सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांचे कुंटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून
नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, यापैकी
कोणतीही एक व्यक्‍ती) असे 90 ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शोतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह
अनुदान योजना राबविण्यास संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी लाभ प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या
व्याख्येमध्ये दोतकऱ्याचे (आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक
व्यक्ती) यांचा समावेश ग्राह्य धरण्यात यावा.

अधिकृत GR क्लिक करा

योजनेंतर्गत देय लाभ :- सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शोतकऱ्यांना /त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे
खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील.

अ.क्र अपघाताची बाब नुकसान भरपाई
1 अपघाती मृत्यू रु.२,००,०००/-
2अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक पाय किंवा एक हात निकामी झाल्यास रु.२,००,०००/-
3अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यासरु.१,००,०००/-

योजनेमध्ये समाविष्ठ विविध अपघात माहिती :

  • १) रस्ता / रेल्वे अपघात, २) पाण्यात बुडुन मृत्यू .
  • ३) जंतुनाशके हताळताना अथवा अन्य कारणाने विषबाधा, ४) विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात .
  • ५) विज पडून मृत्यू, ६ खुन, ७) उंचावरुन पडून झालेला अपघात,
  • ८)सर्पदंश व विंचुदंश, ९) नक्षलाईट कडून झालेल्या हत्या
  • १०) जनावरांच्या खाल्यामुळे मृत्यू, / चावल्यामुळे जखमी / ११) बाळंतपणातील मृत्यू
  • १२) दंगल १३) अन्य कोणताही अपघात .

योजनेमध्ये समाविष्ठ नसलेले अपघात

१) नैसर्गिक मृत्यू, २ विमा कालावधी पुर्वीचे अपंगत्व ३) आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा
जाणीवपुर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे,
४) गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात ५)
अमंली पदार्थाच्या अमंलाखाली असताना झालेला अपघात, ६) भ्रमिष्ठपणा ७ शरिराअंतर्गत रक्‍तस्राव ८) मोटार
शर्यतीतील अपघात
९) युध्द, १०) सैन्यातील नोकरी, ११) जवळच्या लाभधारकांकडून खुन.

अर्ज करावयास लागणारी कागदपत्रे

  • १) ७/१२ उतारा
  • २) मृत्यूचा दाखला
  • ३) शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद.
  • ४) वारसदाराचे ओळखपत्र : आधारकार्ड/ पॅनकार्ड /बँक पासबुक/निवडणुक ओळखपत्र
  • ५) अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला :- जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला/शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र /आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना / पारपत्र / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र .
  • ६) प्रथम माहिती अहवाल / घटनास्थळ पंचनामा / पोलिसपाटील माहिती अहवाल
  • ७) अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्र (पपत्र-अ) .

योजनाचे फायदे

  • आर्थिक सुरक्षा : अपघाताच्या प्रसंगी मिळणारी विमा रक्कम कुटुंबाच्या जीवनमानासाठी महत्त्वाची ठरते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तणाव कमी करण्यास मदत होते.
  • मानसिक शांती : या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक मानसिक सुरक्षा मिळते, कारण त्यांच्या कुटुंबाचे भविष्य अपघाताच्या वेळी सुरक्षित आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना ही शेतकऱ्यांना एक नवा आशावाद देते. shetkari vima 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मान मिळतो आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षा सुनिश्चित केली जाते. सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक स्थिरता साधता येईल आणि शेतीच्या क्षेत्रात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल.

योजना आणि सुविधांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी Rojgarsarthi.com या वेबसाइटला भेट देणे अत्यंत आवश्यक आहे. येथे त्यांना योजनांच्या अटी, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहिती उपलब्ध होईल. तसेच आरोग्य सुरक्षेसाठी योजना संबधित योजेसाठी येथे क्लिक करून त्या योजनेची माहिती घेऊ शकता .